दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, शिंदे, फडणवीस आणि अमित शहांच्या बैठकीत आता पंकजा मुंडेंची एंट्री | जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला पडणार भगदाड, तब्बल 22 नगरसेवक लागले शिंदे गटाच्या गळाला | दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, शिंदे, फडणवीस आणि अमित शहांच्या बैठकीत आता पंकजा मुंडेंची एंट्री | जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला पडणार भगदाड, तब्बल 22 नगरसेवक लागले शिंदे गटाच्या गळाला | दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, शिंदे, फडणवीस आणि अमित शहांच्या बैठकीत आता पंकजा मुंडेंची एंट्री |
पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा २०१९-२० मधील गैरव्यवहार प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता. या प्रकरणात शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह इतर आरोपींचा तपास करण्यात येत होता. तपासात उमेदवारांच्या ‘ओएमआर शीट’ची पडताळणी करण्यात आली, तेव्हा राज्यातील सात हजार ८८० अपात्र उमेदवारांना पात्र...
अनिल देशमुख यांनी नियमित जामिनासाठी केलेल्या अर्जावर ४ फेब्रुवारीला सुनावणी होणार
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्राची विशेष न्यायालयाने शुक्रवारी दखल घेतली. दुसरीकडे देशमुख यांनी आता नियमित जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर ४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
भाटेवाडी तलाव नाळवंडी येथील ‘न्यू हॉटेल सातबारा’ चे उद्घाटन जल्लोषात
पाटोदा : बीड जिल्ह्यात बीड-अहमदनगर रोड वरील घाटेवाडी तलाव नाळवंडी येथे नव्याने सुरू झालेल्या ‘न्यू हॉटेल सातबाराचा’ उद्घाटन समारंभ गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता जल्लोषात पार पडला. या हॉटेलचे उद्घाटन मा. आमदार सुरेश (आण्णा) धस( विधान परिषद सदस्य बीड, लातूर, उस्मानाबाद तथा मा. महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते पार पडले. शिवाजी...
पुढील काही आठवड्यात कोरोना मृत्यूदर वाढण्याचा डॉक्टर सुपे यांचा अंदाज
मुंबई : सध्या भारतात कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. कोरोनाची तिसरी लाट २१ डिसेंबर पासून सुरु झाली होती.रुग्णसंख्या जरी वाढत असली तरी मृत्यूदर नियंत्रित ठेवण्यात भारताला यश आले होते. परंतु पुढील दोनचार आठवड्यात कोरोना मृत्यूदर वाढण्याची भीती वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. मृत्यूदाराची तुलना केल्यास पहिल्या एकदोन आठवड्यांपेक्षा...
श्रेयस तळपदेच्या वाढदिवसानिम्मित संकर्षण कऱ्हाडेनी श्रेयससाठी लिहिली खास पोस्ट
मुंबई : मराठीसह बॉलीवूड मध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविलेल्या श्रेयस तळपदेचा काल वाढदिवस होता .श्रेयस सध्या झी मराठी वरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रार्थना बहिरे सोबत मुख्य भूमिकेत दिसत आहे. यात त्याने साकारलेल्या यश ही भूमिका सर्वांनाच आवडत आहे. या मालिकेत यशच्या मित्राची म्हणजेच समीरची भूमिका अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यानी...
महाराष्ट्रासह इतर १० राज्यांत थंडीची लाट, येत्या २४ तासात तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता
पुणे : राज्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत आहे. यातच येत्या २४ तासात तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यामुळे हवेत गारवा पसरून महाराष्ट्रासह इतर काही राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासात अनेक भागात कमी तापमान नोंदले असून मध्य महाराष्ट्रात धुळे , नंदुरबार, जळगाव ,पुणे,अहमदनगर,...
भाजपला दिलासा ; सुप्रीम कोर्टाकडून भाजपच्या १२ आमदारांच निलंबन रद्द
नवी दिल्ली : एका अधिवेशनापेक्षा निलंबन सभागृहाच्या क्षेत्रात नसल्याचे सर्वोच न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे १२ आमदारांना निलंबन करणे हे असंविधानिक आहे असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय चुकीचा ठरलेला आहे. येत्या मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार असून या १२ आमदारांचे विधानभवनात पुन्हा...
राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी : नवाब मलिक
मुंबई : राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. १००० चौरस फुटाच्या दुकानातच वाईन विक्री करता येणार आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात बऱ्याच वाईनरी असताना आता १००० चौरस फुटांच्या छोट्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला...
गडचिरोलीत भीषण अपघातात भाजप नेते आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू
गडचिरोली : गुरूवारी सकाळी अतुल गण्यारपवार व आनंद गण्यारपवार हे चामोर्शी येथून ब्रम्हपुरीमार्गे चारचाकी वाहनाने नागपूरला जात होते. दरम्यान , ट्रॅक्टरने कारला समोरासमोर दिलेल्या धडकेनंतर झालेल्या अपघातात चामोर्शी येथील भाजपाचे जिल्हा सचिव तथा ‘मन की बात’ कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर, रासप...
चांगली कामगिरी केल्याने या खेळाडूंकडे लक्ष द्यायला हवे : सुनील गावसकर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेमध्ये देखील भारतीय संघाला नामुष्कीजनक पराभवाचा सामना करावा लागला. एकदिवसीय मालिकेत ‘क्लीन स्वीप’ पत्करणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीवर सध्या मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असताना आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली...