news-details
राजकारण

विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे, मात्र … – शरद पवार

यावेळी शरद पवार यांनी ”काश्मिरमधील एक घटक निघून गेला, त्यावर एक सिनेमा आला, काँग्रेसवर टीका झाली. मन जोडण्याऐवजी मन तोडण्याच काम झालं. समाजात विद्वेष पसरायला मदत केली जाते, गांधींवर टीका टिप्पण्णी या चित्रपटाच्या माध्यमातून केली जाते. काश्मीर मधून काश्मिरी पंडित बाहेर पडले तेव्हा सत्तेत काँग्रेस नव्हती, तर व्हीपी सिंह यांची सत्ता होती. भाजपाचं त्याला सहकार्य होते म्हणजे भाजपाच्या सत्तेच्या काळात काश्मिरी पंडित बाहेर गेले. मतभेद, मतभिन्नता असू शकते मात्र परस्परबाबत सन्मान असण्याची गरज आहे. गांधी, नेहरूंनी देशाला दिशा दिली नुसते स्वातंत्र्य दिले नाही. देशाला एकसंघ ठेवायचं आहे.” असंही बोलून दाखवलं.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments