news-details
क्रीडा

टी-२० वर्ल्डकप खेळण्याची सुवर्णसंधी हुकली?

भारतीय क्रिकेटमध्ये नेहमीच ही चर्चा सुरू असते की, संजू सॅमसनला संधी मिळत नाही. नुकताच भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिका पार पडली. या मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये त्याला संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. मात्र तिसऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळालं. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला.

येत्या जून महिन्यात भारतीय संघाला टी -२० वर्ल्डकप खेळायचा आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ शेवटची टी -२० मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. मात्र तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसन शून्यावर बाद होऊन माघारी परतला. या सुमार कामगिरीमुळे त्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments