news-details
राजकारण

निकटवर्तीयांवरील छापेमारीनंतर आदित्य ठाकरेंची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया

मुंबई: वादग्रस्त आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे, शिवसेनेचे निकटवर्तीय राहुल कनाल तसेच संजय कदम यांच्या निवासस्थानी आयकर खात्याचे छापेमारी सुरु असल्याची माहिती आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने सकाळीच छापा मारला. ते शिर्डी देवस्थानचे विश्वस्त देखील आहेत.

यावर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, याआधी देखील अशाप्रकारची आक्रमणे झालेली आहेत. ही दिल्लीची आक्रमण आहेत, असंही ते ठामपणे म्हणालेत. पुढे या कारवायांबाबत बोलताना त्यांनी म्हटलंय की, ही भाजपची प्रचार यंत्रणा झाली आहे. पण महाराष्ट्र झुकणार नाही आणि थांबणार नाही, असंही ते ठामपणे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रावर आधी देखील अशी आक्रमणे झाली आहेत. ही दिल्लीची आक्रमणे आहेत. आधी देखील इथे निवडणुका लागेल असं कळलं आणि महाविकास आघाडीची भाजपला भीती वाटायला लागली तेंव्हापासून असं सुरु आहे. हे यूपीमध्ये आणि हैद्राबाद आणि बंगालमध्येही असं झालं आहे. आता महाराष्ट्रात निवडणुका येऊन राहिलेल्या आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात हे सुरु आहे. या यंत्रणा म्हणजे भाजपच्या प्रचारयंत्रणा झालेल्या आहेत. मात्र, या प्रकारासमोर महाराष्ट्र झुकणार नाही, आणि महाराष्ट्र थांबणार नाही, असं त्यांनी ठामपणे म्हटलं आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments