news-details
व्यापार

इंधन दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार…; केंद्रीय अर्थमंत्र्यांचं सूचक वक्तव्य

आंतरराष्ट्रीय तेल बाजारामध्ये तेलाच्या वाढत्या दरांमुळे केंद्र सरकारची चिंताही वाढलीय. युक्रेन आणि रशियादरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढल्याने केंद्र सरकार देशातील इंधनाचे दर स्थिर ठेवण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदींचा वापर करण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी यासंदर्भात भाष्य करताना कच्च्या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढल्याने त्याचा परिणाम देशातील इंधनदरांवरही होणार आहे, असं सांगितलं. मात्र याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसू नये म्हणून सरकार वेगवेगळे पर्याय पडताळून पाहत असल्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले.

कुठे बोलत होत्या केंद्रीय अर्थमंत्री?
केंद्रीय अर्थमंत्री बंगळुरु येथे आयोजित ‘आत्मनिर्भर भारतीय अर्थव्यवस्था’ या भाजपाने आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी भारतीय तेल कंपन्यांकडून इंधनदरवाढ नियंत्रित राहील यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे संकेत दिले. तसेच आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील दरवाढीचा ग्राहकांना कमीत कमी फटका बसावा असे पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही निर्मला सीतारमन यांनी सूचित केलं.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments