news-details
राजकारण

भाजपाच्या मोर्चामधून फडणवीसांना पोलिसांनी ताब्यात घेऊन काही वेळाने केली सुटका

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाने आज मुंबईमधील आजाद मैदानामध्ये आयोजित केलेल्या धडक मोर्चामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र आंदोलक शांत झाल्यानंतर फडणवीस यांना काही वेळाने सोडून देण्यात आलं. फडणवीस यांच्यासहीत भाजपाच्या अन्य नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मागील अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाकडून केली जात होती. याच मागणीसाठी आज भाजपाने मुंबईत मोर्चा काढलाय. या मोर्चाला ३० ते ४० हजार लोक उपस्थित असतील असा दावा भाजपाने केलाय.

मलिक यांच्या राजीनाम्यावरुन राजकारण तापलं…
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा विषय राज्यातील राजकारणामधील संघर्षाचा मुद्दा झालाय. भाजपाकडून सातत्याने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र त्यावेळी दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत ही मागणी फेटाळून लावलीय. असं असतानाच आज भाजपाने मलिक यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईमध्ये धडक मोर्चाचं आयोजन केलं आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments